गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२
संचित...!
शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२
कृष्णसखा...!
षडरिपूंच्या कौरवांशी लढतांना
सगळ्यात अवघड युद्ध
लढावे लागते ते कर्णाशी
कारण...
कायम उपेक्षल्याने
आत्म्याच्या अतृप्त वासनांना
आणि मनस्वी दुखावल्याने
मैत्रीच्या कोंदणात
धुरंधराला जिंकणे सोपे नसते,
विकार सांभाळायला
आणि कर्णाचा अर्जुन व्हायला,
सख्याच्या रुपातला
कृष्ण भेटायला हवा,
कृष्ण भेटायलाच हवा...!
सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२
प्रतिज्ञा...?
सभी भारतीय मेरे भाई-बहन हैं।
मैं अपने देश से प्यार करता हूं और मुझे इसकी समृद्ध और विविध विरासत पर गर्व है।
मैं हमेशा इसके योग्य बनने का प्रयास करूंगा।
मैं अपने माता-पिता, शिक्षकों और सभी बड़ों का सम्मान करूंगा और सभी के साथ शिष्टाचार का व्यवहार करूंगा।
मैं सभी जानवरों का सम्मान करता हूं और अपने देश और अपने लोगों के लिए, मैं अपनी भक्ति की प्रतिज्ञा करता हूं।
उनकी भलाई और समृद्धि में ही मेरी खुशी है।
जय हिन्द!
रविवार, २४ जुलै, २०२२
डिस्टोपियेन...?
रविवार, १७ जुलै, २०२२
अ-शोक...!
रविवार, १० जुलै, २०२२
नाविक...!
रविवार, ३ जुलै, २०२२
'...हम नहीं तोडेंगे?'
अडीच वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१९ मध्ये लिहिलेल्या 'ये दोस्ती...' चा उत्तरार्ध लिहावा लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते... इतक्या अनाकलनीय, अनैसर्गिक आणि अकल्पित घडामोडींने स्व(?)रुपास आलेल्या आघाडीत बिघाडी करण्याची बहुतांची मनीषा लपून राहिली नसली तरी तिचे पर्यवसन त्याहूनही अधिक वैचित्र्यपूर्ण आणि विस्मयकारक असावे हे मात्र नवलच.
शोलेच्याच रुपकातून सांगायचे तर हे म्हणजे -
...गब्बरने ठाकूरचा काटा काढून मित्रशोकात पिऊन बेधुंद झालेल्या वीरूला बसंतीच्या मौसीला पुन्हा एकदा इमोशनल ब्लॅकमेल करून, बसंतीचे लग्न हिराशी लावून देतांना सांबाला कन्यादान करायला लावले. यामुळे हताश झालेल्या रामलाल, इमामचाचा आणि राधा यांनी आपल्या आधीच हतबल असलेल्या आयुष्याला आणखीनच डागण्या मिळालेल्या पाहून हवेलीला कुलुप लावून, चाव्या कमरेला खोचून काही दिवस गाव सोडायचा निर्णय घेतला म्हणून कालिया खुश झाला...
...असा काहीसा क्लायमॅक्स तोही दोनदा (अबब!) घडला.. भूमिका आणि पात्रे पुन्हा एकदा आपण आपली निवडून घ्यावी... आपला नाव घ्यायचा काम नाय... आणि ते लोकशाही बिकशाही बकवास करून डोक्याची मंडई करायचा तर मुळीच काम नाय, कळ्ळा का...? कुठेही नेऊन ठेवला असला तरी 'जय महाराष्ट्र' माझा...!








