गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११

चाळीशी...!?!


"तीशीतून मागे पाहत होतो, तेव्हा बालपणीच्या आठवणींचे चटके विसरलो नव्हतो. चाळीशीतून बालपण, त्यातल्या पाढे, मोडी पुस्ती, भूगोलाचे कूट प्रश्न आणि इतिहासाच्या सनावळ्या ह्या वेदना जमेला धरून सुद्धा मजेशीर वाटायला लागते.

तारुण्यात निराळ्या अर्थाने चटका लाऊन गेलेल्या व्यक्ती पुन्हा भेटल्या की शेक्श्पिअर चालीवर 'हाच का तो चेहरा - की ज्याने बुडवली होती असंख्य गलबते आणि जन्माला घातले होते ट्रोयचे युद्ध ?' असे स्वतालाच मिस्कीलपणे विचारावेसे वाटते.

सारी युद्धे शांत झालेली असतात. मन देवटाक्या सारखे निर्मळ होते आणि म्हणूनच कदाचित नवा रंग स्वीकारायला नाही म्हणत नाही. मनाच्या खरया औदार्याचा साक्षात्कार चाळीशीतच होतो आणि म्हणून कदाचित प्रथमच चाळीशी चढवलेल्या त्या कुण्या इंग्रजाने म्हटले असेल की, आयुष्याची सुरुवात चाळीशीत होते.

न्याय - अन्याय, मान - अपमान, प्रेमभंग आणि प्रेमपूर्ती, निर्धनता आणि सधनता हे सारे भोग भोगून चाळीशीतला माणूस म्हणतो, "अस्सं ! ह्या खेळाचे नियम हे आहेत होय ? आल लक्षात. आता मांडा सारीपाट !" 

- पु ल देशपांडे

धन्यवाद दिना, तुझ्यामुळे इतके चपखल लिखाण शोधायचे आणि टाईप करायचे काम वाचले...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा