रविवार, १९ एप्रिल, २०२०

द्वंद्व...!



आपल्या अंतर्मनात दोन लांडग्यांच द्वंद्व अहर्निश चालू असत, बर का मुला!
आजोबा आपल्या नातवाला आयुष्याचं तत्वज्ञान गोष्टीरूपाने सांगत होते.
यातला एक लांडगा असतो दुष्ट तो म्हणजे आपला क्रोध, असूया, दु:ख, पश्चाताप, लोभ, मद, विषाद, अपराध-भावना, न्यूनगंड, असत्य, स्वार्थ, खोटा बडेजाव, विधिनिषेधशून्य स्पर्धा, बेगडी प्रतिष्ठा, स्वकेंद्रित क्षुद्रपणा आणि अहंकार.
...आणि दुसरा? लक्षपूर्वक ऐकणाऱ्या मुलाने उत्सुकतेने विचारले.
दुसरा असतो सुष्ट तो म्हणजे आनंद, मन:शांती, प्रेम, आशा, निर्मळ, निरागस भाव, नम्रता, सहानुभूती, भूतदया, सहवेदना, औदार्य, सत्य, करुणा आणि विश्वास! ही लढाई जशी तुझ्या-माझ्या आत चालली आहे तशीच प्रत्येक दुसऱ्या माणसाच्या मनातही निरंतर चालली आहे.
मुलगा थोडा वेळ विचारात पडला आणि बालसुलभ जिज्ञासेने म्हणाला, आजोबा, शेवटी यातला कुठला लांडगा जिंकतो?
आयुष्य बघितलेल्या आजोबांनी सहज स्वरात उत्तर दिलं,
आपण ज्याचं भरण-पोषण करू तो...!
---------------------------------------------------------------------------------
सामान्य परस्थितीत गळेकापू स्पर्धेच्या ऐहिक जगात मानभावी सामाजिक प्रतिष्ठेचं सोंग वठविण्यासाठी पहिल्या लांडग्याचे यथास्थित भरण-पोषण करून आपण त्याला धष्टपुष्ट बनवीत असतोच. आणि पर्यायाने ही अंतर्मनातील लढाई त्यानेच जिंकण्याची सोयही अनायसे करून ठेवीत असतो.

पण आत्ता सारख्या असामान्य, स्पर्धाविहीन, समसमान परिस्थितीत आपण जेव्हा आपल्याच जगण्याकडे थोड्या निवांतपणे आणि ‘सुखदु:खे समे कृत्वा...’ अशा साक्षेपी भावाने पाहू शकतो तेव्हा, नाईलाज म्हणून का होईना, दुसऱ्या लांडग्याला थोडा खुराक लावायला काय हरकत आहे. न जाणो तेवढ्याच पोषणाने तरतरी येऊन एका नव्या आवेशाने तो पाहिल्यावर मात करायचा...?

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि II

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

उपरती...!


सकाळी आपल्या लांब पसरलेल्या सावलीकडे पाहून कोल्हा म्हणाला, ‘आज मला जेवायला उंट पाहिजे...!’
सकाळभर उंटाच्या शोधात हिंडून दमलेल्या कोल्ह्याने दुपारी पायाशी जमा झालेल्या सावलीकडे बघितले आणि म्हणाला, 
‘...उंदीरही चालेल खर तर!'
----------------------------------------------
आपण कोण आहोत आणि आपली गरज किती हे आपल्या प्रतिमेवर अवलंबून असू नये.
ते तसे भासल्यास निसर्ग योग्य वेळी आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो...
आत्ताचा ठहराव याची जेवढी जाणीव देईल तेवढीच शहाणीव देखील... अर्थात ज्याला उपरती होईल त्याला!

शुभम भवतु !

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

माया...?



नारदमुनींनी एकदा कृष्णाला विचारले, प्रभूमाया म्हणजे हो काय...?’
सुहास्यवदन कृष्ण प्रश्न टाळून हलकेसे स्मित करता झाला.
याला मायावी म्हणतात ते उगीच नाही!’नारद मनी म्हणाले.

काही दिवस गेले आणि नारदांना कृष्णाकडून वनविहारचे आमंत्रण आलेप्रत्यक्ष कृष्णाच्या आमंत्रणाने हरखून गेलेल्या नारदमुनींच्या मनात कुठलाही संदेह उमटला नाहीमोठ्या उत्साहात नारद श्रीकृष्णासोबत प्रसन्न चित्ताने वनविहाराला निघाले

बघता बघता नगर मागे पडले आणि घनदाट जंगल सुरू झालेसूर्य माथ्यावर आलाकृष्ण एका झाडाखाली विसावला आणि श्रमाने दमल्या आवाजात म्हणाला,
नारदाउष्मा खूपच वाढलाय आणि माझ्या घशाला कोरड पडली आहेकुठे पाणी मिळते का बघतोस?’
देवातुम्ही इथे विश्राम कराजवळच झऱ्याचा आवाज येतोयमी पळभरात पाणी घेऊन हा आलोच.’
आणि नारद आवाजाच्या रोखाने झऱ्याच्या शोधात निघाले.

जवळच भासणारा आवाज हळूहळू लांब जाऊ लागला आणि चालण्याचा वेग वाढवून नारद जंगल तुडवत धावू लागलेबराच वेळ धावल्यावर नारदांचा श्वास फुलला आणि आता अधिक धावणे शक्य नाही असे त्यांना वाटते न वाटते तोच निबीड वाटणारे अरण्य अचानक संपले आणि एक छोटेसे टुमदार गांव लागलेगावातल्या पहिल्याच घरच्या दारावर नारद थांबले आणि तहानेने कासावीस झालेल्या जीवाला शांत करण्यासाठी पाणी मागावे म्हणून दारावर थाप मारून दार उघडण्याची प्रतीक्षा करू लागले.

थोड्याच वेळात एक अत्यंत रूपवती तरुणीने दार उघडले आणि हा कोण अभ्यागत अशा विचारात ती कमरेवर हात ठेऊन उभी राहिलीतिच्या त्या लावण्याने आणि मोहक विभ्रमांनी संमोहित झालेल्या नारदांना आपल्या तहानेचा पूर्ण विसर पडला आणि ते त्या युवतीशी बोलण्यात मश्गुल झाले.

उन्हं कललीदिवस सरला आणि शेतावर गेलेला तरुणीचा बाप घरी परतलापाहतो तर कुणा वाटसरुशी मुलगी बोलत उभी आहेबापाने पाहुण्याला घरात बोलावलेविचारपूस केली आणि आता अंधाराचे पुढे जाणे ठीक नाही म्हणून दोन घास खाऊन रात्रीला मुक्काम ठेऊन सकाळी उजाडल्यावर मार्गक्रमण करण्याची सूचना केलीनारदांना ही कल्पना फारच आवडल्याने त्यांनी तत्काळ स्वीकारली.

दुसरे दिवशी भल्या पहाटे उठूनप्रातर्विधी आटोपून शेतकरी आपल्या शेतावर गेला आणि नदीवर स्नानसंध्येला गेलेले नारद सर्व आटोपून शेतकऱ्याच्या घरी येऊन पुन्हा मुलीशी गुलूगुलू बोलत बसलेहाच दीनक्रम दोन-तीन दिवस चालला आणि पाहुणा हलण्याचे नाव घेत नाही म्हटल्यावर चार पावसाळे पाहिलेला शेतकरी काय ते उमजला.
माझी एकुलती एक मुलगीतिला जन्माचा जोडीदार मिळाला तर मला तरी आणखी काय हवेतुमचे लग्न लावून देतोरहा इथेच घरजावई म्हणून आणि माझं ओझं हलकं करा.’ म्हणाला.

नारदांना आपल्या कानांवर विश्वास बसेनाअगदी हर्षवायूच व्हायचा बाकी राहीला आणि शेतकऱ्याचा इरादा बदलण्याअगोदर नारद गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर उभे राहिले आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू झालासासरेबुवांबरोबर रोज शेतावर जावेते सांगतील ते काम शिकावेकरावे आणि थकून घरी यावेजेवण झाल्यावर बायकोशी सुखदु:खाच्या चार गोष्टी करीत झोपी जावे असे सुखासीन आयुष्य चालले.

कालगतीनुसार संसरेबुवांना देवाज्ञा झाली आणि दरम्यान पाठीला पाठ लावून आलेली चार चिल्लीपील्ली अंगणात खेळू लागलीअशा सगळ्या सुखा-समाधानाच्या दिवसात २४ वर्षे उलटली.

...आणि एक दिवस सारे गाव रात्री झोपेत असतांना अचानक मोठा हल्लकल्लोळ माजलासारे वाट फुटेल तिकडे सैरावैरा धावू लागले. नदीला पूर आलानदीला पूर आला... धावाधावाजीव वाचवा...’ असा आरडाओरडा चहू बाजूंनी ऐकू येऊ लागलानारदांची सुखनिद्रा भंग झाली आणि भानावर येत त्यांनी हाती लागेल ते द्रव्यधान्यकपडेलत्तेदाग-दागिने गाठोडयात भरून बायको आणि चारही मुलांना घराबाहेर काढले आणि तेही इतरांसारखे जीवाच्या आकांताने धावू लागले.

बघता बघता पाणी वाढू लागले आणि हात धरलेला मोठा मुलगा हात सुटून पाण्याच्या प्रवाहात ओढला गेलात्याला वाचवायला म्हणून पाण्यात पाय टाकलेल्या बायकोच्या हातातला हात सुटून दुसरा मुलगाही एक मोठ्या लोंढयाने ओढून नेलाडोळ्यासमोर दोन मुलांना जलसमाधी मिळालेली बघूनबायकोचा हात अधिकच घट्ट धरून नारदांनी तिला बाजूला ओढले तर त्या हिसक्याने बायकोच्या कडेवरचे मूल पाण्यात पडले आणि प्रवाहाला लागलेया सर्व प्रकाराने हतबुद्ध झालेल्या नारदांनी एका झाडाच्या बुंध्याचा आधार घ्यावा म्हणून पाय टाकला तर तो नेमका खोलात पडून त्यांच्या कडेवरील मुलंही निसटले आणि तोल जाऊन भेलकांडत पुढे तोंडावर पडल्याने नारदांच्या हातून बायकोचा हातही सुटलानवऱ्याच्या आधारावर विसंबून बेसावध असलेल्या बायकोला खळाळत्या पाण्यात तोल सांभाळणे अवघड होत असतांनाच मागून आलेल्या लोंढयाच्या रेट्याने नारदांच्या बायकोला त्यांच्या डोळ्यासमोर प्रवाहात ओढून नेले!

या सगळ्या प्रकाराने भयचकित झालेल्या आणि दु:स्वप्नाप्रमाणे भासणाऱ्या या साऱ्या गोष्टींची संगती लावण्याच्या प्रयत्नातभकास चेहऱ्याने विमनस्क अवस्थेत कमरेपर्यंत पाण्यात उभ्या असलेल्या नारदांच्या कानी मृदू आवाजातले स्निग्ध शब्द पडले,

वत्सापाणी आणतोयस नाएक पळ की रे झाला...!’
-------------------------------------------------------------------------------------------

नारदांना माया म्हणजे काय हे दाखविणारा कृष्णकलियुगात आपल्याला तो वस्तुपाठ द्यायला करोनाच्या रूपाने आलाय कायया निमित्ताने मुळात जंगल तुडवत आपण हा प्रवास काकुठून आणि कशासाठी सुरू केला होता हे एकदा निवांतपणे तपासून पाहू या का...? आणि होमोहमाया त्यागूनअंगाला राख फासून वैराग्य वगैरे सामान्य माणसांचे काम नव्हे आणि संसारी माणसासाठी ते उचितही नव्हेतेव्हा दुसरे टोक गाठायची काहीच गरज नाहीगदिमांनी संत गोरा कुंभाराच्या रुपकातून दिलेला मोलाचा सल्ला मानला तरी पुष्कळ आहे... काय म्हणतात गदिमा?

तुझे रूप चित्ती राहोमुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दाससुखे करो काम!

लौकिक अर्थाने ऐहिकातून वानप्रस्थाला जाण्याची मुळी गरजच नाहीमायामोहाबद्दलची आसक्ती हळूहळू कमी करीत निरासक्त मनाने संसारातील विहित कर्म करित राहणे हाच वानप्रस्थाश्रमहे साधले तर नित्यकर्मही साधनेपेक्षा वेगळे नाही आणि अशा निर्विकार जगण्यातून क्षणोक्षणी मिळणारा आनंद हा मोक्षाहून निराळा नाही!

बघाआता करोनाच्या निमित्ताने तरी निर्विकार होणं पटतंय का…!