रविवार, २१ एप्रिल, २०१९

कोलाहल...



मानवी संस्कृतीच्या इतिहासात काव्य-शास्त्र-विनोद यांनी समृद्ध अशा साहित्याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्यातही अग्रमान मिळालेल्या काव्य या साहित्यप्रकारास विशेष महत्व यासाठी की चिंतनशील आणि संवेदनशील वृत्तीच्या प्रचीतीची ही अभिव्यक्ती नऊ शब्दात नवरस उलगडून दाखविण्याची क्षमता राखून आहे. मानवी भाव-भावनांचे प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या या समृध्द अशा परंपरेचे भौगोलिक, प्रांतवार आणि भाषानिहाय असे अनेक प्रवाह आढळून येतात. त्या त्या प्रदेशामध्ये त्या त्या काळात काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा एवढा प्रभाव राहिला आहे की त्या काळाची ‘युगवाणी’ म्हणवून घेण्याचा मान त्यांना लाभला. ई.स. १९१८ ते १९३६ या अठरा वर्षाचा कालखंड हिंदी साहित्यातील ‘छायावाद’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रवाहाचा ऐन भरीचा काळ. तत्पूर्वीच्या द्विवेदी युगातील आदर्शवादी, उपदेशात्मक, निरस अशा काव्यप्रवाहाशी विद्रोह म्हणून, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचा प्रभाव असलेल्या भावनाप्रधान, कल्पनारम्य, नवउन्मेषी तथा स्वप्नाळू छायावादाचा उगम झाला. जयशंकर प्रसाद, सूर्यकान्त त्रिपाठी 'निराला', पंत, महादेवी वर्मा हे चार साहित्य-शिरोमणी या प्रवाहाचे हस्तिदंती खांब, बिनीचे शिलेदार.

जयशंकर प्रसाद यांनी निबंध, कथा, कादंबरी, नाटक आणि कविता अशा सर्व साहित्यप्रकारांच्या माध्यमातून हिंदी भाषा समृद्ध केली. त्यांच्या साहित्यसेवेच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणजे कामयानी हे महाकाव्य. साहित्यिक मूल्य, कल्पनाविहार, स्वप्नाळू काव्यात्मकता तथा चिंतनशील आशयघनता अशा सर्व स्तरांवर कालिदासाच्या मेघदूताची आठवण व्हावी अशी अलौकिक रचना म्हणजे कामायनी. सुमारे ७-८ वर्षाच्या तपस्येचे फळ म्हणजे १९३६ साली प्रकाशित झालेले जयशंकर प्रसाद यांचे साहित्यशारदेच्या चरणी वाहिलेले हे अखेरचे काव्यपुष्प! ‘चिंता’ या विकाराने आरंभ होऊन ‘आनंद’ या विहाराने समारोप होणाऱ्या १५ अध्यायांच्या या महाकाव्यात मानवाच्या भावप्रवासाचा पट कवीने अशा खुबीने उलगडून दाखविला आहे की आदीपासून मायेपर्यंतच्या मनोविकासाचा तसेच सांस्कृतिक संक्रमणाचा इतिहास सूज्ञास उमजावा. अरविंद-दर्शन आणि गांधी-दर्शन यांचा प्रभाव इथे तिथे जाणविणाऱ्या प्रत्यभिज्ञा दर्शनवर आधारित, ‘कामायनी’मध्ये कथानकाच्या पात्रांच्या रूपकातून येणाऱ्या लज्जा, सौंदर्य, श्रद्धा आणि शालीनता या चित्तवृत्तींचे दर्शन हे कलाक्षेत्रातील छायावादी काव्यप्रतीभेचे सर्वोत्कृष्ठ प्रतिक मानले जाते.

‘कामायनी’चे कथानक हे निश्चिंत आणि चिरतरुण आयुष्य लाभल्याने भोगविलासी झालेल्या देवलोकाने आपल्या बेधुंद, बेदरकार आणि अनिर्बंध आत्ममग्नतेने केलेला अविचार प्रकृतीस सहन न झाल्याने त्यावर तोडगा सृष्टीनेच कसा काढला इथे सुरु होते. एका महाभयंकर विनाशकारी प्रलयाच्या ‘उपाया’तून सृष्टीने अविवेकी, भोगवादी देवसृष्टीचा विनाश केला ज्यातून केवळ मनु वाचला. चिंतारहित आणि चिरंजीव अशा देवलोकांच्या विनाशातून उगम पावलेल्या मानव जातीचा मूळ स्वभाव हा चिंता आणि मृत्यूभय यावरच विकास पावेल अशी प्रतिबंधात्मक तरतूद प्रकृतीने करून ठेवली. चिंतेशिवाय मनुमध्ये देव आणि दानव या दोन्ही वृत्तींचा अंतर्भाव असल्याने एका बाजूला आशा, श्रद्धा, लज्जा आणि शालीनता याबरोबर दुसऱ्या बाजूला षडरिपुंचा प्रादुर्भाव यांचा संघर्ष सुरु होता. या निरंतर संघर्षाच्या अनुभूतीने मनुस विरक्तीची आस लागली आणि त्यातून त्याचा श्रद्धेच्या मार्गाने जीवन-दर्शन, जीवन-रहस्य, आत्मभान आणि सच्चिदानंद असा प्रवास सुरु झाला. या रूपकाच्या माध्यमातून सांगितलेला मानवजातीचा पशुपालन, शेती, समाजधारणा आणि त्यातून औद्योगिक क्रांतीतून साधलेली भौतिक समृद्धी, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि परिणामस्वरूप माणसाला वाटणारी अध्यात्माची सुप्त ओढ अशी ही समस्त मनुष्य योनीच्या उगम आणि विकासाची कहाणी आहे.

‘कामायनी’चा नायक आहे मनु आणि नायिका कामायनी म्हणजे कामपुत्री श्रद्धा. मनु मनाप्रमाणे चंचल आहे. तपस्वी जीवन व्यतीत करणाऱ्या मनुस श्रद्धेच्या मोहाने प्रणयाची बाधा होते. तदनंतर आकुलि व किलात या असुरांच्या प्रभावाने तो हिंसा व मनमानी करीत श्रद्धेस सोडून वाऱ्यावर भटकत सारस्वत प्रदेशात पोहोचतो. श्रद्धेस त्यागल्याने तिचा पिता काम मनुवर क्रोधीत होऊन त्यास शाप देतो ज्यामुळे किंकर्तव्यदिग्मूढ अवस्थेत मनु लौकिकाच्या संसर्गाने बुद्धीस शरण जातो आणि भौतिक विकासाच्या आहारी जातो. तथापि संयमाचा अभाव आणि अस्थिर, अचपळ चित्त यामुळे लौकीकातील प्रजेशी त्याचा संघर्ष होतो आणि तेथील मानहानीकारक पराभवाने व्याकुळ झालेला मनु लौकिकातून पळ काढून पुन्हा एकदा अध्यात्मामध्ये श्रद्धेच्या सहाय्याने सच्चिदानंद शोधतो. अशा तऱ्हेने श्रद्धा, लौकिकाची ओढ, बौद्धिक क्षमता, भौतिक समृद्धी, संघर्ष, चिंतनशीलता आणि आध्यात्म या मनुष्याच्या चिरंतन आणि अटळ प्रवासाचे अत्यंत विचक्षण आणि विलक्षण विश्लेषण कामायनी या काव्याविष्कारात आढळते.

एका मुक्त चिंतनाच्या योगाने सुरु झालेला माझा हा अभ्यास या आकलनापाशी येऊन थांबला की आपल्या जाणिवांचा हा ‘वासने’पासून ‘विरक्ती’पर्यंतचा प्रवास न नवीन आहे न एकमेवाद्वितीय; हा एक आदीपासून अंतापर्यंत चालणारा वर्तमानाचा प्रवाह आहे ज्याचा एका तटावर भूतकाळ आहे तर दुसऱ्या तटावर भविष्य. प्रत्येक प्रवाहपतीत जीवास हे चक्र भेदून किंवा खरे तर भोगूनच पुढे जायचे आहे! यातून मुक्तीचा मार्ग हा केवळ ज्ञानाने प्राप्त होऊ शकणारा आणि ते ज्ञान म्हणजे सॉक्रेटीसच्या भाषेत, ‘माझ्यापुरते सांगायचे तर मला एवढेच ज्ञात झाले आहे की मला काहीही ज्ञात नाही...’ अर्थात दुसऱ्या अवतरणात, ‘शुरुआतका कोई अंत नहीं...’ आता या ब्रह्मज्ञानें आलेल्या शहाणीवेने पुन्हा एकदा ते गीत ऐकता बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला तर काही नवीन दुर्बोध गर्द झाले... पण यातच तर साला मजा आहे, नाहीतर आहेच की तेच ते, तेच ते, तेच ते, आणि तेच ते... पण असे गुढरम्य ‘ग्रेस’ थ्रू ‘जी. ए.’ व्हाया ‘विंदा’ असे नको, पहिल्यापासून सांगतो...

या सगळ्या केमिकल लोच्याचे आणि आमच्या हिंदी साहित्य घुसळणीचे मूळ पुन्हा एकदा आमच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे आमचे जळगावचे स्नेही-सुहृद, ‘टिक-टिक’कार श्री. प्रदीप रस्से सर! हा माणूस अशक्य आहे. यांच्यावर काही लिहू म्हटले तर एक आयुष्य पुरेल असे नाही, कारण आमच्या प्रतिभेची तेवढी लांबी-रुंदी आणि खोलीही नाही. पण म्हणून या अवलिया प्रती आपल्या तोडक्या-मोडक्या शब्दात व्यक्तच होऊ नये असे थोडीच आहे! प्रत्येक भेटीत हा माणूस जसा थोडा अधिक उलगडत जातो तसा काहीतरी नवीन खाद्य पुरवतो आणि एरवी ‘...तुका म्हणे आता | उरलो उपकारापुरता...’ अशा आमच्या जगण्यास काही उद्देश पुरवून त्यातील लुप्त होऊ पहाणारी खुमारी वाढवतो. या वेळेस काय तर म्हणे ‘...तुमुल कोलाहल कलह में...’ बरं, माणूस इतका इम्पल्सिव्ह की लहान मुलासारखा हट्टच! काही हवे म्हणजे हवेच... तेही आज, आत्ता ताबडतोब! असे कुठे असते का? विषय समजून घ्यावा लागतो, संदर्भ-तपशील गोळा करावे लागतात, आकलनास काही अवधी द्यावा लागतो... आणि हे सारे रीतसर झाल्यावर, समर्थांच्या वचनानुसार अभ्यासोनी प्रकटावे । ना तरी झाकोनी राहावे । प्रकटोनी नासावे । हे बरे नव्हे ॥ म्हणून अभ्यास करतो तर थोडा अवधी लागणार की नाही...? असो!

गुलजार, आरडी आणि आशाताई या त्रिवेणी संगमाच्या स्निग्ध प्रवाहात जे मोती वेचले त्यातील ‘मेरा कुछ सामान...’ हा शीर्षस्थ शुभ्र मौक्तिक. याच्या तोडीचे पुन्हा कधी आयुष्यात मिळेल, गवसेल, भेटेल असे काही वाटले नव्हते. पण या आमच्या गोताखोर स्नेह्यांनी पुन्हा एकदा कलासागरात डुबकी मारून काढले काय तर हे अमृत... “तुमुल कोलाहल कलह में मैं ह्रदय की बात रे मन...” आता याबद्दल या माणसाचे आभार कसे मानावे...? त्याचा हट्ट पुरवून! सर, माझ्याकडून तुमचा हट्ट पुरवायला अक्षम्य विलंब झाला असला तरी घेतलेल्या वेळेचे चीज करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलाय हे या विश्लेषणावरून पटावे... आणि माफ करालच याबद्दल बालंबाल खात्री! काही गीला-शिकवा शिल्लक राहिलाच तर प्रवासाला निघण्यापूर्वी विसाव्याचे थंडगार बॉम्बे ठिकाण आहेच...  

तर ‘तुमुल कोलाहल कलह में...’ लौकिक, मर्त्य आणि व्यवहारी जगाच्या गदारोळात अडकून ज्याची कुचंबणा होते आहे अशा मनुस, श्रद्धेच्या त्याच्या आयुष्यातील आगमनाने लाभणारी शांती, समाधान आणि थोडासा विसावा हे या गीताचे मूळ बीज आहे. ‘अभिव्यक्त’ यांच्या ब्लॉगवर या गीताचे हिंदीमध्येच अत्यंत समर्थ निरुपण सापडले. हिंदी राष्ट्रभाषा असल्याने आणि मराठी समजणाऱ्या बहुंतास हिंदी समजत असल्याने केवळ भाषांतराचे ओझें वागवून भारवाही होण्यापेक्षा आहे तसे ते पोहचवून मर्मग्राही व्हावे हे उचित या विचाराने ते उधृत करीत आहे, त्याचा स्त्रोत येथे पाहू शकता -                                                             

तुमुल कोलाहल कलह में
मैं ह्रदय की बात रे मन

विकल होकर नित्य चचंल,
खोजती जब नींद के पल,
चेतना थक-सी रही तब,
मैं मलय की बात रे मन!

विश्व के तुमुल कोलाहल में अर्थात सांसारिक मार-पीट, भागा-दौड़ी, लूट-खसोट इत्यादि जंजालों के बीच मैं हृदय की बात (श्रद्धा) हूँ! जग-जीवन के नित्य के व्यापारों से थक कर जब चेतना नींद के सुखद पल खोजने लगती है, श्रम के पश्चात विश्राम खोजने लगती है तब मैं मलय पर्वत की सुवासित, शीतल और सुखद हवा के रूप में आती हूँ और चेतना की पीड़ा को, उसके श्रम के भार को हर लेती हूँ।

चिर विषाद-विलीन मन की,
इस व्यथा के तिमिर-वन की;
मैं उषा-सी ज्योति-रेखा,
कुसुम-विकसित प्रात रे मन!

जीवन दुख और विषाद के अंधकार में उलझा हुआ है, खोया हुआ है; उससे निकलने का रास्ता नहीं उसे नहीं सूझता है। व्यथा के अंधेरे वन में कोई रास्ता मिले भी तो कैसे मिले? परंतु मैं उसी व्यथा के घनघोर अंधेरे वन में ज्योति की रेखा के समान हूँ , कलियों को खिला देने वाली सुंदर, सुखकर, प्रेरक प्रभात के समान हूँ।

जहाँ मरु-ज्वाला धधकती,
चातकी कन को तरसती,
उन्हीं जीवन घाटियों की,
मैं सरस बरसात रे मन!

जीवन अतृप्ति के कारण धधकती हुई मरूभूमि(रेगिस्तान) के समान है। इस मरुभूमि में (जीवन में) अतृप्त मन चातक पक्षी के समान तृप्ति रूपी स्वाति की बूंद (आंशिक तृप्ति) के लिए तरस रहा है। जीवन की उन्हीं जलती घाटियों में मैं तृप्ति की सरस वर्षा के समान हूँ अर्थात अतृप्ति के कारण सूखे जीवन में मैं सम्पूर्ण तृप्ति हूँ, जहाँ बून्द की इच्छा है वहाँ मैं पूरी बरसात हूँ। 

पवन की प्राचीर में रुक,
जला जीवन जी रहा झुक;
इस झुलसते विश्व दिन की
मैं कुसुम-श्रृतु-रात रे मन!

पवन की प्राचीर क्या है? हमारे चारों ओर वायु का एक बहुस्तरीय आवरण है जिसे हम 'वातावरण' कहते हैं। यह वातावरण भी किस ओर संकेत करता है? क्योंकि 'पवन की प्राचीर' मतलब तो वातावरण हो गया अगला शब्द है 'में'। पवन की यह प्राचीर धरती के ही तो चारों ओर है। अतः 'पवन की प्राचीर में रुक' का अर्थ हुआ धरती या समाज; सामान्यीकरण कर दुनिया कह सकते हैं क्योंकि इसके व्यापक अर्थ में दोनों आ जाते हैं। दुनिया के बंधनों में, कर्मकाण्डों और अनुशासनों में जीवन जकड़ गया है। इन जागतिक व्यापारों के भार से जीवन जल रहा है तथा अब उसकी शक्ति, उसकी ऊर्जा जवाब दे रही है। जीवन श्रमित और क्लांत होकर झुक चुका है। दुनिया में व्याप्त कठिनाइयों, परेशानियों, व्यवधानों, छन्दों, बंधनों, अनुशासनों से जेठ की दोपहरी के समान जलते जीवन में मैं कुसुम-ऋतु की रात अर्थात बसंत ऋतु की सुंदर, सुहानी रात हूँ।

चिर निराशा नीरधार से,
प्रतिच्छायित अश्रु-सर में;
मधुप-मुखर मरंद-मुकुलित,
मैं सजल जलजात रे मन!

जीवन का आकाश निराशा के बादलों से भरा है, तथा निराशा के उन बादलों के नीचे आँसुओं का महान(विशाल) सरोवर है। कभी समाप्त न होने वाले निराशा के बादलों से चारों ओर से घिरे आँसुओं के विशाल सरोवर के बीच मैं प्रेम, करुणा और अनुराग से भरी एक जलजात अर्थात कमल हूँ। आशा के मकरंद और जीवन की सुगंधी से युक्त मेरे मुकुलित रूप पर मधुप(भौंरा) मन मंडरा रहा है। चारों ओर व्याप्त इस निराशा के वातावरण में मेरे आशा रूपी मकरंद का ही उसे सहारा है। ध्यान देने वाली बात यह है कि बादलों का रंग स्याह होता है; व्यथा और निराशा का रंग भी नीला होता है। आँसू जब सरोवर के रूप में राशिभूत होंगे तब उस सरोवर का रंग भी नीला होगा। लेकिन कमल का रंग अरुण होगा- कुछ-कुछ लाल, कुछ-कुछ गुलाबी। ये अरुण रंग आशा का रंग है, अनुराग का रंग है, प्रभात का रंग है और शुरुआत का रंग है। इस बात को ध्यान में रखकर पढ़ने पर उपरोक्त पंक्तियों के अर्थ में और गहराई आ जाती है। वैसे तो पूरे गीत में सानुप्रासिक पदों की योजना हुई है परंतु अंतिम में अनुप्रास अपने पूरे सौंदर्य के साथ उपस्थित हुआ है- "मधुप-मुखर मरंद-मुकुलित, मैं सजल जलजात रे मन!"। 'मकरंद' के स्थान पर 'मरंद' शब्द का प्रयोग कर संगीतात्मकता की रक्षा की गई है तथा इससे अतिरिक्त कोमलता भी आयी है। 'जलजात' के लिए 'सजल' विशेषण के प्रयोग ने रूप और अर्थ दोनों के स्तर पर सुंदरता को बढ़ाया है।

‘तुमुल कोलाहल...’ च्या निमित्ताने मला मानवी आयुष्याच्या एका अभिजात अनुभवाशी आणि ‘सुभग विश्वा’शी कायमचे बांधून टाकल्याबद्दल रस्से सरांप्रती मन:पूर्वक कृतज्ञता आणि आता ‘आ चल के तुझें...’ पासून ‘मेरा कुछ सामान...’ पर्यंतच्या माझ्या पोतडीत ही ‘तुमुल कोलाहल...’ची शिदोरी, माझे उर्वरित जिणे (आणि चिंतन) सुगंधित करीत, माझ्याबरोबरच जाणार हे निश्चित...!

इति लेखनसीमा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा