मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

आसुड...!


नीतीविना तत्व गेले,
तत्वाविना विवेक गेला,
विवेकाविना विचार गेला,
विचाराविना विकार वाढले,
विकारांनी सत्ता भ्रष्टली,
‘लोक’ खचले ‘शाही’ राहिली;


परचक्र गेले गुलामी राहिली!

‘शेतकऱ्याचा आसुड’ आणि ‘गुलामगिरी’कर्त्या महात्म्याची क्षमा मागून;
त्याच्या युगप्रवर्तक स्मृतीस सादर समर्पित...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा