रविवार, २२ जानेवारी, २०२३
सुखेनैव...!
रविवार, १५ जानेवारी, २०२३
कणभर तीळ...!
शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२
मूल्य...!
राजा पराक्रमी होता, अजेय होता, प्रजाहितदक्षही होता. एका मोठ्या ऐतिहासिक विजयानंतर राजाने महायज्ञ करायचे ठरविले. यज्ञात कर्मकांडाबरोबर दानधर्माचेही प्रयोजन होते आणि त्याचे स्वरूप भव्यदिव्य होते. सोने-चांदी, पशुधन-नाणी कशा कशाची कमतरता नव्हती. प्रजा येत होती, खाऊन-पिऊन-लेऊन-घेऊन तृप्त होत होती. राजाचे तोंडभरून गुणगान करून भरभरून आशीर्वाद देऊन सुखावत होती. चैतन्याचा, आनंदाचा उत्सवी पूर ओसंडून वाहत होता. कशाला म्हणून कमी नव्हती. राजाच्या चेहऱ्यावर अतीव समाधान दाटले होते.
तेवढ्यात राजाची नजर एका मुंगूसावर गेली. हा काही वेगळाच दिसणारा मुंगूस दानासाठी रचून ठेवलेल्या साहित्यात लोळून पुन्हा वळून आपल्या शरीराकडे पहात होता. राजाला या शुभकार्यात विघ्न आणणाऱ्या मुंगुसाचा मनस्वी रागही आला आणि त्याच्या उपद्व्यापाबद्दल कुतुहुलही वाटले. सोन्याची शेपटी असलेल्या या मुंगुसाला राजाने थोडे दरडावूनच विचारले, ‘काय रे, काय चाललेय तुझे? तुला खायला काही हवे असेल असेल तर धान्यांची कोठारं उघडी आहेत, त्यातून हवे ते पोटभर खा, इथे यज्ञात का लुडबूड करतो आहेस?’
मुंगूस म्हणाला, ‘क्षमा असावी, महाराज ! मी काही उपद्रवमूल्य जोपासणारा व्यावसायिक लाभार्थी प्राणी नाही. एका रात्री एका गावात, काही खायला मिळते का बघावे म्हणून एका झोपडीत शिरलो. अगदीच अन्नान दशा झालेले कुटुंब त्या झोपडीत राहत होते. त्या घरातल्या माउलीने घरातील चार माणसांसाठी मोठ्या मुश्किलीने दोन भाकऱ्या थापल्या होत्या आणि पाण्याबरोबर अर्धी-अर्धी भाकरी गिळावी असा विचार करत असतांना झोपडीचे दार वाजले. दारात एक अभ्यागत उभा होता आणि चार दिवसांपासून उपाशी असलेल्या त्या अभ्यागताला, मिळालेच तर, दोन घास हवे होते.
घरच्या माउलीने विचार केला आपण अर्ध्याच्या जागी चतकोर खाऊ पण पाहुण्याला उपाशी नको ठेवायला. भुकेल्या पाहुण्याने अधाशीपणाने अर्धी भाकरी खाल्ली आणि आशेने पाहू लागला. पाहुणचारात कमी नको, आपण आणखी एक दिवसाने काही मरत नाही असा विचार करून घरधन्याने उरलेली अर्धी भाकरी पाहुण्याला देऊ केली. पाहुण्याने तातडीने ती देखील फस्त केली आणि लोटाभर पाणी पिऊन चालता झाला.
इकडे कुटुंबातील चौघांनी रात्रभर भुकेने तडफडून प्राण सोडले. ‘आता इथे खायला काय मिळणार?’ अशा विषण्ण विचाराने मी झोपडीतून बाहेर पडतांना माझे शेपूट चुलीजवळ रेंगाळले. माउलीने भाकरी थापतांना त्या पिठाचे काही कण तिथे चुलीजवळ सांडले होते. त्या कणांच्या स्पर्शाने माझे संपूर्ण शेपूट सोन्याचे झाले.
आता अशा शरीर मूंगूसाचे आणि शेपटी सोन्याची अवस्थेचे काय करावे, त्यापेक्षा सगळे शरीरच सोन्याचे करून घ्यावे म्हणून मी जिथे कुठे यज्ञयाग, दानधर्म चालला आहे असे समजते तिथे जाऊन पाहतो. तिथल्या दानवस्तूत लोळून पाहतो. वाटते, कणभर पीठाने जे साधले ते हिरे-मौक्तिक, सोने-नाण्याने कसे साधणार नाही? पण कसे कुणास ठाऊक, कितीही भव्यदिव्य, झगमगता, खैरातींची लयलूट असलेला लाख मोलाचा दानधर्म चालला असला तरी माझ्या शरीराचा एक केसही काही सोन्याचा होत नाही.
असे का होत असावे, महाराज…?’
-----------------------------------------------------
बहुतेकांना माहित नसलेली आणि आजही कुठेही वाचण्यात न आलेली पेलेंबद्दलची एक आठवण: पेले जेव्हा पहिल्यांदाच व्यावसायिक फुटबॉल सामना खेळले तेव्हा त्याबद्दल त्याना मानधनाचा चेक देण्यात आला. चकित होऊन तो स्वीकारतांना पेले लहान मुलाच्या औत्सुक्याने आणि आश्चर्यमिश्रित आनंदाने उद्गारले, ‘...म्हणजे मला याचे पैसे देखील मिळतील?’ [मला यातून जो आनंद आणि आत्मिक समाधान मिळते तेच पुरेसे होते!]
-----------------------------------------------------------------------------
वरील दोन्ही गोष्टीतून काही बोध वैगरे घेण्याची काहीही सक्ती नाही. वर्षाअखेरी काही वेगळे कानावर पडले तर नववर्षाच्या मुहूर्तावर त्या दिशेने निदान विचार तरी सुरु करता येईल, एव्हढेच…
बाकी सगळे सुरु, बंद करण्यासाठी नववर्ष संकल्प आहेतच, त्यासाठी मनापासून शुभेच्छा… !
शुभम् भवतु !
मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२
मौनाध्याय...!
मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२
‘उपयोग ...?’
बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२
शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२
पुरुषोत्तम वैगरे...
सेवक : समशेरबहाद्दर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जयजयकार असो’
महाराज : छान ! उत्कृष्ट ! बरं, चोरीमारी वगैरे ?
प्रधानजी : छे ! कोणी चोरी करत नाही. फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत.
महाराज : फारच छान. बरं, रोगराई वगैरे ?
प्रधानजी : बिलकुल नाही ! चार-दोन साथीचे रोग आले. त्यांत शे-पाचशे माणसे गेली.
महाराज : त्यांच नाव काय म्हणालात ?
प्रधानजी : गानसेन.
महाराज : बरं बरं, बोलवा त्यांना.
(गवईबुवा येतात. नमस्कार करतात.)
महाराज : गवईबुवा, तुम्हांला काय येतं ? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता ?
महाराज : बरं बरं, म्हणा काहीतरी.
(गवईबुवा मांडी घालून बसतात. हातवारे करून बेसूर आवाजात एक गाणे म्हणतात. महाराज खूश होतात)
महाराज : वा ! गवईबुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस
गवई : महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत.
महाराज : अवश्य, अवश्य ! काय बरं करावं? (विचार करतात. मग टाळी वाजवून)
प्रधानजी : आज्ञा महाराज.
प्रधानजी : ठीक आहे, सरकार.
महाराज : जो कुणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा.
प्रधानजी : आत्ताच दवंडी दयायची व्यवस्था करतो.
(हळूहळू रंगमंचावर अंधार होतो. त्या अंधारातच प्रथम दवंडीचा आवाज व नंतर दवंडीवाल्याचे गाण्यात
दवंडीवाला : (गाण्याच्या चालीवर)
ऐका हो तुम्हि ऐका !
ऐका हो ऐका !!
आजपासुनी सर्व बोलणे,
व्हावे केवळ गाणे गाणे.
केवळ गाणे आणि तराणे,
चालणार नच इतर फलाणे.
राजाज्ञा जो मोडिल कोणी,
देउ सुळावर त्यास तत्क्षणी.
ऐका हो तुम्हि ऐका !!
(दवंडी संपते. रंगमंचावरील प्रकाशात दोन पहारेकरी हातांत भाले घेऊन एकमेकांशी बोलत येतात.)
पहिला : काय एकेकाचे आवाज भसाडे आहेत रे । त्यांनीसुद्धा गायचं म्हणजे काय हे !
दुसरा : लोक अगदी त्रासून गेले आहेत.
पहिला : शूऽ ! कुणी गद्य बोललं, तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपणसुद्धा नाही बोलायचं,
दुसरा : ए, ते बघ, ती दोघ नवरा-बायको भांडत इकडेच येत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूया.
पहिला : चल तर लवकर.
(दोघे बाजूला उभे राहतात. नवरा घाईघाईने येतो. मागून बायको येऊन त्याचा हात धरते.
बायको : तेल संपले, तूप संपले, मीठ संपले;
हा चाललो बाजाराला,
आणून देतो माल तुला.
बायको : (हातात पिशवी देत) अन् येताना शेर-दोन शेर,
नवरा : (बायको गेल्यावर स्वतःशीच गुणगुणत)
आणखी ती काय सांगी ?
(आठवत आठवत नवरा जातो. दोघेही पहारेकरी हसत हसत पुढे येतात.)
पहिला : कमाल आहे बुवा ! भांडणसुद्धा गाण्यात करायचं !
दुसरा : आता है नवरोजी गेले बाजारात. तिथे ही गर्दी माणसांची ! प्रत्येकजण गाण्यातच बोलतोय !
पहिला : खरच, बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही ?
दुसरा : अरे, गंमत म्हणजे काय? नुसती मजा चाललीय मजा ! समज तू दुकानदार अन
दुसरा : (गात) दया तर आम्हा एकच शेर, घालू नका हो कचराकेर.
पहिला : (गात) माल अमुचा पांढराफेक, कांदे किती हे स्वच्छ सुरेख !
दुसरा : (गात) चार आणे नाहीत फार, मांडून ठेवा आज उधार.
पहिला : (गात) नाही नाही, नाही चालणार, आज रोख उद्या उधार.
(दोघेही खूप हसतात. मग नेहमीच्या आवाजात बोलतात.)
पहिला : कारे, बाजारात ही गंमत! मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल ?
दुसरा : राजवाड्यात? अरे, तिथे तर साधं गाणं नाही, शास्त्रीय संगीत! सगळं रागदारीत चाललंय.
पहिला : चल, तिथली गंमत प्रत्यक्षच बघितली पाहिजे. चल, चल लवकर.
(‘गद्य कोण बोलतो’ हे गाणे म्हणत दोघेही जातात. रंगभूमीवर थोडा वेळ अंधार. मग राजवाडा दिसतो.
महाराज : (गाणे म्हणत प्रवेश करतात.) आलो आलो मी. राणी कुठे आमची ?
राणी : (गात) ही इथे महाराज मी.
महाराज : (गात) आज तुझे तोंड सुकले कशाने ?
राणी : (गात) या पडशाने मज गांजियले.
(सटासट शिंकते.)
महाराज : (गात गात आज्ञा करतात.) जा जा जा झणी घेऊन या वैद्या.
(एक सेवक ‘महाराज, महाराज’ अशा गाण्यातील हाका ऐकू येतात.)
महाराज : (घाबरून गातात) अरेऽऽ काय झालेऽऽ ?
सेवक : (गडबडीने प्रवेश करून गातो.) महाराजऽऽऽ प्रधानजी
महाराज : (गात) अरेऽऽ, काय झालं ? बोल लवकरी.
सेवक : (गात व ताना घेत) महाराजऽऽऽ
महाराज : (गात) अरे बोल ना झडकरी
सेवक : (गात) महाराज, आपुला प्रिय राजवाडाऽऽ
महाराज : (गात) पुढे बोल गद्ध्याऽऽ
सेवक : (ताना घेत तीच ती ओळ घोळून घोळून म्हणतो) महाराज, आपुला प्रिय राजवाडाऽऽ
महाराज : (चिडून नेहमीच्या सुरात) आता बोलतोस लवकर का मुंडकं उडवू तुझं ?
सेवक : (गातगातच) आपुला प्रिय राजवाडा, जळुनि खाक झाला.
महाराज : (घाबरून) काय ? माझा राजवाडा जळला? मेलो, ठार मेलो मी, अन् मूर्खा,
सेवक : (नेहमीच्या आवाजात) क्षमा करावी महाराज, पण आपलीच आज्ञा होती ना सगळं
महाराज : खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी - (प्रधानजी समोर येतात.) प्रधानजी, लोकांना
प्रधानजी : जशी आज्ञा सरकार राजवाडा सुखरूप आहे आपला. थोडक्यात वाचला.
महाराज : फारच छान, उत्कृष्ट ! आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला.
प्रधानजी : हां हां महाराज, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा । क्षमा असावी.
महाराज : शाबास प्रधानजी, पटल आम्हांला रद्द केली आम्ही आमची आज्ञा, खरं आहे तुमचं,
प्रधानजी : पण आज्ञा रद्द झाली ना ?
महाराज : झाली म्हणजे काय? झालीच !
रविवार, ४ सप्टेंबर, २०२२
आवाहन...!
गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२
संचित...!
शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२
कृष्णसखा...!
षडरिपूंच्या कौरवांशी लढतांना
सगळ्यात अवघड युद्ध
लढावे लागते ते कर्णाशी
कारण...
कायम उपेक्षल्याने
आत्म्याच्या अतृप्त वासनांना
आणि मनस्वी दुखावल्याने
मैत्रीच्या कोंदणात
धुरंधराला जिंकणे सोपे नसते,
विकार सांभाळायला
आणि कर्णाचा अर्जुन व्हायला,
सख्याच्या रुपातला
कृष्ण भेटायला हवा,
कृष्ण भेटायलाच हवा...!








