मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

(अ)विराम(चिन्हे)


खर तर बोलायचे नव्हतेच काही
पण सांगण्याची तुला इतकी घाई

काय दाखवायचे होते नवीन असे
माझ्या स्वप्नांच्या वाटेवर तुझे ठसे

जगलो होतोच कधी लौकिकासाठी
जमविले उन्मनी क्षणच तेवढे गाठी

गेलेल्या क्षणांची कोण ठेवतो याद
जगल्या सुखांचीही नको मोजदाद

भविष्याच्या भुताला कधी ना भ्यालो
प्याला त्या क्षणाचाच हरघडी प्यालो

जगावे असे की मृत्यूला भ्रम पडावा
मरावे असे की सृष्टीस विरह घडावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा